Literature

आर्यसंस्कृती

आर्यांची संस्कृति फार मोठी आहे. जगाकडे पाहिले तर ते एका सुखासाठी अव्याहत कार्यरत आहे. सुख काय आहे ह्याचा शोध जगात चालू आहे. आर्यानीच खऱ्या सुखाचा शोध लावला. जग ही एक प्रयोग शाळा आहे. जे सुख सर्वांना पाहिजे ते जड पदार्थापासून मिळणार नाही हा सिद्धांत आहे. सुख हे बाह्यपदार्थात नाही, मग एवढा खटाटोप का? सुख नसेल तर प्रयत्न होऊ न देता त्याचे समाधान ज्याचे त्यांना करता येईल. आपल्या अनुभवावरून ही गोष्ट कळून येते. जगांत सुखासाठी एकसारखा प्रयत्न चालू आहे; पण नितांत शांतीचा अनुभव मिळत नाही असा सर्वांना अनुभव येतो. • Uneasy lies the head that wears the crown ‘न सुखं देवराजस्य।’ इंद्रसुद्धा सुखाला पारखा आहे. परंतु ज्यानी मनाला जिंकलें त्यालाच खरें सुख मिळते. बाहय पदार्थाविषयी ज्यांच्या गरजा कमी झाल्या आहेत तोच सुखी. — He is happy, whose wants are few.’ बाह्य गरजापासून अशांति निर्माण होते. ‘न जातुः कामः कामानां उपभोग्येन शाम्यति । हविषा कृष्णवमव भूय एवधिवर्धते ॥’ बाह्य पदार्थाच्या प्राप्तीचे उपाय अशांतीला कारण आहेत. त्यापासून मनाला शांति प्राप्त होत नाही. ह्या जगांत त्यागातच शांति मिळते. मनुष्याचा मार्ग मात्र चकला आहे. त्यागानें तो खऱ्या मार्गावर येतो. तसेंच आपण कितीहि प्रयत्न केले तरी सुख मिळेळच असे नाही. एक तत्वज्ञानीच मात्र सुखी आहे.

सुखाकरिता ह्या जगांत आटोकाट प्रयत्न चालू आहेत. आपल्यांत ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ अशी म्हण आहे व ती सर्वांच्या परिचयाची आहे. सर्वानाच स्वर्ग मिळत नसतो. तो फक्त योग्यावाच योगसामर्थ्याने प्राप्त होतो. आपल्या शुद्ध स्वरूपाच्या प्राप्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अंतरमुख ध्यानाच्या अभ्यासाने त्याला त्याची प्राप्ती होते. संत शिरोमणी तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठास जाता आले. तेव्हा ह्या गोष्टी परमेश्वरी कृपेशिवाय शक्य नाहीत. हे दिव्यदृष्टीचे सामर्थ्य आहे. ‘लोमेश’ नांवाचे ऋषी अद्यापहि आहेत. त्यांना सर्व ठिकाणी जाण्याची अव्याहत गती आहे. प्रत्येक युगास त्यांचा एक केस गळून पडतो. अशा प्रकारचे त्यांचे सामर्थ्य आहे. तेव्हा अशा प्रकारचे सामथ्यं परमेश्वर कृपेनें ज्ञान झाल्यावर योगाच्या द्वारेंच ते शक्य आहे. अशा योग्याला अथवा ज्ञान्याला इच्छा शक्ति प्राप्त होते व त्याच्या सर्व इच्छा फलद्रूप होतात. इतरांना ते कदापीही शक्य नाही.

यौगिक सामर्थ्य किंवा तपःसामर्थ्य अथवा ज्ञानसामर्थ्य ह्यांच्या योगानें तो सर्वात्मभावास प्राप्त होऊन त्याच्याठायीं अलौकिक तेज प्रकट होते व त्यालाच ‘ आत्मिकबल’ म्हणतात. ह्या बळापढ़ें भौतिक बळाची किंमत नाही आपल्या देहांत पांच भूतें आहेत म्हणन शरीर हे पंचभौतिक होय. पायापासून गुढग्यापर्यंत पृथ्वीतत्त्व, गुडग्यापासून मांडीपर्यंत आपतत्त्व, मांड्यापासून हृदयापर्यंत अग्नितत्त्व, हृदयापासून भृकुटीपर्यंत वायुतत्त्व व त्याच्या वरच्या भागांत आकाशतत्त्व. ह्या प्रत्येक तत्त्वाशी जर प्राणवायु स्थिर करता येऊ लागला तर तो सर्वसमर्थ होतो. त्याला कोणी रोखू शकत नाही. हे योगसामर्थ्य असून सध्या तरी ही विद्या लुप्त झाली आहे. अशा ह्या शक्तींपुढे बाकीच्या बाह्य भौतिक शक्त्ति तुच्छ होत.

आपला आर्य देश ह्या कार्यात फारच पुढे होता आपल्या आर्य संस्कृतीमुळे व तिच्यातील तत्त्वज्ञानाने वेड लागलेली मनुष्य पुष्कळ प्रमाणात आहेत. सुप्रसिद्ध अनि बेझेंट, शोपेनहार, मॅक्स मुल्लर हे त्यापैकीच होत. ह्या तत्त्वज्ञानामुळे त्यांना शांतीचा लाभ झाला, असे त्यांचेच उद्गार आहेत. आपला हा ‘भारत देश’ अशा सामर्थ्याचा खजिना आहे व येथूनच हे सामर्थ्य दुसरीकडे गेले आहे. आपले पूर्वीचे ऋषिमुनी ह्या सामर्थ्याने संपन्न होते. काशीराजाचे सामर्थ्याबद्दल असे सागनात की, ते पायानेच स्वगात चालत गेले, महापराक्रमी दशस्थ राजाही स्वर्गाला गेले होते. स्वर्ग खरा आहे. तो काल्पनिक नाही. तो अमरलोक आहे.

असें हैं योगसामर्थ्य आमच्या भारतवर्षात होते. दूरदृष्टी व दूरध्वनीश्रवण अशा सारख्या लहान सिद्धी योगबळाने सिद्ध होतात. सध्याहि आहेत. तात्पर्य, स्वरूपसुखांत तारतम्य आहे. बाह्यसुखाची इच्छा कमी करून अंतर्मुखासाठी प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराची कृपा झाल्यावर ‘मनी धरावे तें होतें। विघ्न अवघेचि नासून जाते। कृपा केलिया रघुनाथें। प्रचित येते ॥’ मनांत आल्यावर व परमेश्वराची कृपा झाल्यावर ‘भक्तें जें जें मनी धरावें । तें तें आधीच देवे करावें ।’ अशा प्रकारचे हे आर्यसंस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे. ही संस्कृति इतर संस्कृतीहून अगदी वेगळी व भिन्न आहे. ज्याला खरे सुख पाहिजे त्याने ह्या संस्कृतीला शरण गेले पाहिजे. असे हे यौगिक सामर्थ्य आहे. तसेंच भक्तिचेहि सामर्थ्य फार मोठे आहे. हा भक्तीचा झरा प्रत्येकाच्या हृदयांत आहे. महाराष्ट्रात जेवढे संत व भक्त होऊन गेले तेवढें कोठेही झाले नाहीत. ह्या मार्गात महाराष्ट्र जसा पुढे आहे तसाच सुधारणांच्या बाबतीतहि पुढे आहे. सारांश तेजस्विता जो पर्यंत पुढे आहे तोपर्यंत जय. तेजस्विता धर्माने येते. विशेषतः परस्री व विषयलोलपता हयापासून अलिप्त रहाणे हे धर्माचें सामान्य लक्षण आहे. भारतीय धर्म काय शिकवतो? तर ज्याच्यामुळे अनंतपरीने असलेले जे सुख व त्या सुखाच्या प्राप्तीची साधनें जो दाखवितो तोच धर्म व ज्याच्या आचरणाने ते सुखकर होते तो ‘आर्यधर्म.’ आर्यधर्माचे मुख्य ध्येय परमात्मप्राप्ती म्हणजेच सर्वसुखप्राप्ति व तेच ध्येय साध्य व्हावे ह्याकरितां सर्व संकल्प आपल्याकडील कन्यादानाच्या वेळी जो संकल्प जातो तो वास्तविक ब्रह्मलोकप्राप्तीसाठी केला जातो. लग्नाच्या वेळी विष्णुरुपिणे वराय’ म्हणून संकल्प आहे. सर्व कार्याच्या संकल्पात जो संकल्प केला जातो तोच परमात्मप्राप्तीच्या ध्येयासाठीच आहे. आज सर्व दृष्टीने विचार केला तर लाजेने मान खाली घालण्याची पाळी आलेली दिसते, इतका समाज अधोगतीला गेला आहे.”

सर्व पृथ्वी बलाने पादाक्रांत करता येईल परंतु मन जिकता येणार नाही. विषयेछेमुळे मन दुर्बल बनते. जरा मन परमात्म प्रकाशानी भरुन जाईल तर ते मन वाटेल ते करू शकेल. महंताचा देह म्हणजे अशा दैविक सामर्थ्यांचा खजिनाच होय. जीवन म्हणजे खऱ्या सुखाचा झरा. तो झरा फक्त भारतातच आहे. परंतु आजची स्थिती पाहू गेले असतां सर्व त-हेने फरक दिसतो. आज प्रत्येक मनुष्य पाश्चिमात्य संस्कृतीने भारावलेला आहे. आपल्यामध्ये ‘जाणवें’ हे जीवब्रह्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे. जाणव्याच्या गांठीला ‘ब्रह्मगांठ’ म्हणतात. तात्पर्य, प्रत्येक आचरण मग ते सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो त्यांत परमेश्वरप्राप्ती हेच ध्येय ठेवून आमच्यातील सर्व संकल्प आहेत. पूर्वीचे लोक त्याचदृष्टीने करीत आलेले आहेत. कन्यादान, वरासंबंधी इत्यादी सर्व संकल्प ब्रह्मप्राप्तीसाठीच करतात. असे संकल्प इतर कोठेही व कोणत्याही धर्मात मिळणार नाहीत. अशी ही थोर संस्कृति आज लोप पावत चाललेली आहे. आपण सर्व तहेर्ने बाटलो आहोत. म्हणून ही गोष्ट सहन होत नाही. प्रजासत्ताक राज्य, तेव्हा राज्यकर्ते असेच बाटलेले. आज सर्वत्र अंधार पसरलेला आहे. स्वप्नांतील दुःखाला औषध जशी जागृती, तशी आपल्यात ह्या संस्कृतीची जागृति झाली पाहिजे. खऱ्या सुखाची साधने ज्या धर्माने सांगितली त्याच धर्माच्या आचरणाने जगावें. त्यालाच जीवन असे म्हणतात व त्याकरताच समाजरचना आहे. पूर्वजन्माच्या संस्कारानुसार पुढील जन्म आहे. ज्याचे काम त्यानीच करावे. ‘जेणोकाम तेणो ठाय, बीजा करे तो गोता खाय’ सर्वांनाच मोठे व्हावे असे वाटते पण मोठेपणा टिकविणे कठीण आहे म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याग धर्मात नीतिनियम लावून दिलेले आहेत ते योग्यच आहे. प्रत्येकाला ह्या आर्यधर्माचा अभिमान वाटला पाहिजे. ज्याचा कोणत्याहि प्रकारचा बुद्धिभेद होत नाही तोच आर्यधर्माभिमानी! धर्म काय सांगतो? दुसऱ्याची वस्तु घेऊ नको! दुसऱ्याच्या हक्काची पायमल्ली करू नको! हीच नीति. पण ती समर्थ होणे शक्य नाही. विषमता हाच जगाचा स्वभाव, ज्येष्ठता व कनिष्टता हाच स्वभाव. नेता, नेणारा पुढे व त्याच्यामागे सर्व जातात. सर्वांचे सामर्थ्य एक नसते. ह्यामध्ये व्यावहारिक व पारलौकिक अशा दोन दृष्टी आहेत. ह्या दृष्टीने जीवन जमावे ह्या जन्माच्या कर्माने हा जन्म नाही. मागील कर्मामुळे हा जन्म तेव्हां जन्मप्रवाहातून सुटण्यासाठीच सर्व प्रयत्न व त्याचकरिता परमार्थ ज्ञात्याचे प्राण कोठेहि जात नाहीत. तो येथेच ब्रह्मांत विलिन झालेला असतो. जन्म राहि त्याकरिता प्रयत्न जन्म. हा जर फक्त ऐहिक सुखाकरतांच असेल तर असे जन्म किती? व हे कसे ठरविणार ? तेव्हां परमात्मप्राप्ती पाहिजे असेल तर त्याकरतां प्रत्येकाने प्रयत्न करावयास पाहिजे. आनंदभावरुप आहे तो कोणता? तर तेच ते ‘आनंद ब्रह्म.’ ब्रह्म कोठे आहे ? ते सुष्टीपूर्वी म्हणजे आकारापूर्वी होते आकार म्हणजे कार्य. म्हणजे ब्रह्म होते, नव्हते असे नाही. त्याचा महिमा अनंत आहे. अशा ह्या ब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय हा जन्मप्रवाह संपणार नाही. आनंद हेच परमात्म्याचे स्वरूप व त्यातच शेवट आहे.

अशा ह्या आर्यसंस्कृतीचे आपण सर्व सुपुत्र आहात. पुत्र म्हणजे पहिली संतति, त्यालाच पुत्र म्हणतात. कारण तो ‘पुन्नाम् नरकात्त्रायते। यापुढील संतति ‘कामज होय.

“वेदोऽखिलं धर्ममूलम् ।’ अशा प्रकारे परमात्माप्राप्तीकरता जी संस्कृती आहे तीच संस्कृति खरी. जीत परमात्मप्राप्ती नाही ती संस्कृतीच नव्हे. अशा परमात्मप्राप्तीचीच संस्कृति आपणांस मिळो! त्या संस्कृतीचे वारसदार आपण आहोत हे विसरू नये. अशी त्या आनंदघन परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे.

home-last-sec-img