Literature

कर्म

‘ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि ।‘ शतकोटी म्हणजे अब्जावधीचे अनेक जन्म असेंहि आपणांस मानता येईल. पण एकंदरीत पाहतां केलेली कर्म भोगूनच संपतात. भोगल्याशिवाय संपत नाहीत, असा ह्या श्लोकर्षाचा अर्थ आहे. ‘प्रारब्ध कर्मणां भोगादेव क्षयः।’ केलेल्या कर्मापासून निवृत्त व्हावयाचे असेल तर त्यांची फळे भोगूनच निवृत्ती प्राप्त होते हे ह्या दुसऱ्या वाक्याचे तात्पर्यं. केलेले कर्म भोगूनच संपविले पाहिजे अशा अर्थाची ‘करावे तसे भरावे’ ही आपल्याकडील म्हण आहे. एकंदरीत पहातां ही सर्व श्रुतिवाक्येच होत. त्यामुळे ती खोटी उरत नाहीत,

‘क्रियते इति कर्म’ जे केले जाते त्यास कर्म म्हणतात. ‘यद्यद्धि कुरुते जन्तुः तत्तत्कामस्य चेष्टितम् । अकामस्य क्रिया काचिद्वर्तते न कदाचन ॥’

ती ती फळे अनुभवाची म्हणनच ती ती कर्मे जीव करीत असतो. अशा प्रकारची कोणतीच आशा नसल्यास त्या जीवाकडून कोणतेहि कर्म होणे संभवत नाही. कर्मफळाचा, अनुभव घेतल्यानंतर त्याला कृत्रिम असे एक प्रकारचे समाधान होणे साहजिक आहे नाही का? ‘कर्तुरीप्सिततमं कर्म।’ कार्याची उत्कट अशी इच्छाच कर्य आहे असे वाटते म्हणजेच ते कर्मास कारण होते असा त्याचा अर्थ होतो. फळ अनुभविण्यासाठी उत्कट इच्छाच त्या त्या व्यक्तीस त्या त्या व्यक्तीस वा त्या फळाच्या साधनीभत असलेल्या कार्यास प्रबळ प्रेरणा देत त. ती ती कर्मे फळ दिल्याशिवाय रहात नाहीत. त्यामुळे ती फळे अनुभवण्याचा समय येईपर्यंत ती कर्म तशीच रहातात. बळीराजाने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरू केले. एकशे आठ राजसूयज्ञ करणारास इंद्रपदप्राप्ती होते असा नियम आहे. ‘ इंद्रास” शतऋतु’ ‘शतमन्य’ अशी दोन नावे आहेत. ‘ऋतौ यज्ञ कोपे च मन्युः मन्यु शब्द क्रोधाबद्दल येतो. बळीसारख्या कित्येक राजांनी यज्ञ केले असतील. ब्रह्मदेवाच्या सकाळच्या वेळत चौदा इंद्र होतात असे एक प्रमाण आहे. तेव्हां अनुक्रमानुसार पाळी येईपर्यंत बळीला पाताळांतच रहावे लागले. एका कल्पामध्ये शक्य नसले तरी शतकोटी कल्पांच्या शेवटी तरी इंद्रपद मिळालेच पाहिजे व त्यासाठी तो पावेतो जिवंतहि राहिले पाहिजे. यावरून ‘ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटि शतैरपि’ याची सत्यता पटते.

कर्म तीन प्रकारची आहेत. त्यांची ‘संचित’ प्रारब्ध व ‘आगामी ‘ अशी नांवे होत. अनेक जन्मापासून करीत आलेले कर्म एकत्र सांठवले जाते ते ‘संचित’ कर्म होय. एकाच जन्मात शंभर जन्मास कारणीभूत ठरणारी आकांक्षायुक्त कर्मे जीव करीत असतो आणि त्यांच्या संकल्पानुसारच तो ती करतो असे एके ठिकाणी सांगितले आहे. अशाप्रकारे प्रत्येक जन्माचे जमणारे संचित किती जन्मांना कारणीभूत होईल? जीवाचे किती जन्म झाले? किती राहिले? हे एका परमेश्वरासच माहित. हा झाला संचिताचा विचार ? ‘प्रारब्ध’ म्हणजे चालू जन्मास कारण असलेल्या संचितामुळे लादले गेलेले मागील जन्मीचे कर्म होय व ‘आगामी’ म्हणजे पुढल्या जन्मास कारणीभूत होणारे ह्या जन्मी घडणारे कार्य होय.

फलासक्ती असेपर्यंत अनेक जन्मात केलेल्या अनेक कर्माची फळे भोगण्यासाठी जीव किती जन्म घेत असेल ते त्या परमेश्वरासच ठाऊक. रहाटगाडगे फिरण्यासारखीच ही गोष्ट आहे. भोवऱ्यात सापडलेल्या मनुष्याप्रमाणेच त्याची अवस्था असते.

पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम् । इह संसारे खलुदुस्तारे कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥

अशी देवाची प्रार्थना करीत राहिल्यास देवास करूणा येईल व तो सद्गुरूचा लाभ घडवून देईल. भोव-यात फिरणाऱ्या मनुष्यास दयाद्रं मनुष्य ज्याप्रमाणे बाहेर काढतो त्याच रितीने श्रीगुरु त्या जीवास जन्ममरणाच्या भोवऱ्यातून बाहेर काढून मोक्षाच्या कडेला पोहोचवतात. एकंदरीत कर्मफलरूप विषयवासना असणाऱ्यांसाठी ‘ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि’ हा सिद्धांत खराच ठरतो.

‘जन्मदुखं जरादुःखं मृत्युदुखं पुनः पुनः । कमलम संसारासागरे दुःखं तस्मात् जागृहि जागृहि ॥

जन्म दुःखमय, म्हातारपणहि दुःखमय, मरण दुःखमय, मग हे जेथे वारंवार भोगावे लागते असे विषयसुखहि दुःखच होय. ‘सर्वदुःखं विवेकिनास्।’ विचार केला असतां ह्या सर्व गोष्टी विवेकी मनुष्यास दुःखरूप आहेत. ‘मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयं विषवत् त्यज।’ मुक्ति प्राप्त करून घ्यावयाची असेल तर विषयांचा विषाप्रमाणे त्याग करावा असे म्हटले आहे. दुःखरूप विषयांच्या त्यागाने जगातील जन्ममृत्यूपासून निवृत्त होऊन त्या सर्वापासून भिन्न अशा ख-या मुक्ति सुखाची प्राप्ती होते हेच स्पष्ट होते. सुखाच्या प्राप्तीचे हेच एक साधन आहे हीच गोष्ट यावरून उघड होते.

सुषुप्तीमध्ये सर्व विषयांची, प्रपंचातील इंद्रियांची आणि देहादींची निवृत्ति झाली म्हणजे खरे सुख मिळाले असे ठरत नाही. कांहीहि न समजणे म्हणजे अज्ञान. हे अज्ञान सुषुप्तीत असते. हे अज्ञान असेपर्यंत जागृति-स्वप्नाच्या दुःखरूप संसाराच्या उत्पत्तीस व सर्वास कारणीभूत असलेल्या विषयवासनेची उत्पत्ती होते. त्यामुळे सत्य प्रवृत्ति ही ज्ञानापासूनच उत्पन्न होते असे स्पष्ट होते. ‘ज्ञानादेव तु केवल्यम् । ‘ ज्ञानानेच कैवल्यप्राप्ती होते हे प्रसिद्ध आहे. आतां ज्ञान कशाचे ? असा प्रश्न उद्भवतो. ‘ ज्ञात्वा देवं जन्ममृत्यु प्रहारिणिः । देवास समजून घेतल्याने जन्म मृत्यूचा नाश होतो हे ह्या वाक्यावरून स्पष्ट होते. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा। कर्माध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेतः केवलो निर्गुणश्च ॥

एकमेव परमात्माच सर्व भूतामध्ये सत्यस्वरूपाने असून सर्व देहामध्ये गूढ रितीने व्यापून आहे. तो सर्वव्यापी व सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. तो सर्व झाल्या गेल्या गोष्टींना साक्षीभूत असून त्यांना प्रकाशमान करणारा असा ज्ञानरूप आहे. तो दुसरा कोणीहि नसून केवळ आपण स्वतःच एकमेव आहे. त्यात नाम, रूप, जाती, गुण, कर्म, कर्तृत्व, भोक्तृत्व, बंध, मोक्ष इत्यादी गोष्टी नाहीत. अशा प्रकारे त्या परमात्म्यास समजून घेतले पाहिजे.

ह्या परमात्म्यास आपल्यापासून वेगळे समजावयाचे की आपलेच स्वरूप समजावयाचे? ‘तद् ब्रह्माहमिति व्याहरेत् ।’ अद्वितिय आनंदधन ब्रह्मच आपण आहोत असे समजावे. ब्रह्म अद्वितीय असल्यामुळे । तेच ‘मी’ असे समजून त्या निष्ठेत असले पाहिजे. ‘मी’ ही जाणीव अचेतन पदार्थांना नसते असे म्हटल्यावर फक्त चैतन्यरूपी परमात्म्याचीच जाणीव होते. तो चैतन्यरूपी परमात्मा आनंदरूपी आहे. ‘आनन्दो ब्रह्म’ आनंदच ब्रह्म होय. तद्विज्ञानेन परिमश्यन्ति धीरा आनन्दरूपमृतं यद् विभति ।’ सर्वरूपी असलेल्या परमात्म्याच्या यथार्थरुपाचे । ज्ञान झाल्यामुळे विवेकीजन आनंदरूपच सर्वत्र पहातात.

भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यते सर्वसंशय। क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥’

अद्वितीय आनंदमात्र असलेल्या ब्रह्मास जो कोणी सर्वत्र पहातो त्याची देहात्मबुद्धीची हृदयग्रंथी मोकळी होते, सर्व संशय नष्ट होतात व सर्व कर्मे नष्ट होतात असे मुंडकोपनिषदांतील वचन आहे.

ज्ञानी लोकांच्या प्रारब्धाविषयीं स्पष्टिकरण करणारे अध्यात्मोपनिषदांतील कांही श्लोक बघू या!

अजरोऽस्म्यमरोऽमीति य आत्मानं प्रपद्यते । तदात्मना तिष्ठतोऽस्य कुतः प्रारब्धकल्पना ॥ प्रारब्धं सिध्यति तदा यदा देहात्मना स्थिति। देहात्मभावो नैवेष्टः प्रारब्धं त्यज्यतामतः ॥

मी जन्म-जरा-मृत्युरहित आहे असे ज्याने केवळ रूपाने आनंदमात्र असलेल्या आत्मरूपास जाणले आहे अशा स्वमात्र असलेल्यास त्या आनंदमात्र स्वरूपात प्रारब्ध कल्पना कोठून येणार? देहात्मबुद्धीने प्रारब्धाची सिद्धी होते. देहात्मभाव कधीहि इष्ट नाही असे म्हटल्यावर प्रारब्धविचारच सोडून द्यावा.

‘प्रारब्धकल्पनाऽप्यस्य देहस्य भ्रान्ति रेष हि।’ “अध्यस्तस्य कुतस्य त्वमसत्यस्य कुतोचनिः। अजातस्य कुतो नाशः प्रारब्धमसतः कुतः॥

देहात्मभावनेच्या भ्रांतीने प्रारब्धाची कल्पना केली जाते. ही कल्पना अध्यस्त असल्याकारणाने रज्जु सर्प न्यायाप्रमाणे अस्तित्वच नसल्यावर तशा नसलेल्या असत्य वस्तूंची निर्मिती कोठून होणार ? जन्मलेल्याला नाश असतोच. ज्याला जन्मच नाही त्याचा नाश कसा होणार ? वंध्या स्त्रीच्या पुत्राप्रमाणे असलेल्या असत्य देहादीपासून प्रारब्ध कसे होईल ? ज्ञानी लोकांचे संचित व आगामी कर्म ज्ञानाने नष्ट होवून प्रारब्धहि अनुभवून नष्ट होते असे वेद, उपनिषदामधून आढळून येत नाही काय? असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर पुढील श्लोकांत आढळून येईल.

‘ज्ञानेनाज्ञानकार्यस्य समूलस्य लयो यदि । तिष्ठत्यय कथं देह इति शङकावतो जडान् । समाधातुं बाह्यदृष्टया प्रारब्धं वदति श्रुतिः । न तु देहादिसत्यत्वबोधनाय विपश्चितान् ।’

ज्ञानाने अज्ञानरूपी कार्य समूळ नष्ट झाल्यावर त्याचे अज्ञानरूप असलेला देह टिकणे कसे शक्य आहे ? अशा शंका घेणाऱ्या आज्ञानीसाठी त्याच्या समाधानासाठी ‘ भाग्यदृष्टीने ज्ञानी लोकांचे प्रारब्ध असेपर्यंत त्याचा देह टिकतो प्रारब्धाचा नाश झाल्यावर त्याचा देह पडून फुटलेल्या घटातील घटाकाश महदाकाशांत आपोआप विलीन झाल्याप्रमाणे ज्ञानी लोक विदेहमुक्ति संपादतात.’ असे सांगितले जाते. ज्ञानी लोकांना देहादींचे असत्यत्त्व सांगण्याची आवश्यकता नसते.

‘पूर्वजन्मकृतं कर्म प्रारब्धमिति कथ्यते । तत्तु जन्मांतराभावात्प्रारब्धं नैव विद्यते ॥’

पूर्वजन्मी केलेल्या ह्या जन्मास कारण असणाऱ्या कर्मास’ प्रारब्ध’ असे म्हणावयाचे तर देहरहित असणाऱ्या आत्मनिष्ठास हा देह वा पूर्वीचा देह असत नाही असे म्हटल्यावरच जन्मांतरच शिल्लक नसणाऱ्यास प्रारब्ध कोठून असणार? यावरून ज्ञानी जनांना प्रारब्ध नाहीच असे सिद्ध होते. आपणास देह दिसत असल्याने व देहामुळे काम घडत असल्याने झालेल्या व होणाऱ्या कर्माना कोणते तरी इष्टानिष्ठफळ मिळत असल्यामुळे देहाकडून होणाऱ्या पाप-पुण्यात्मक कर्माचे सुखदुःखरूपी फळ ज्ञानींना मिळत नाही असे म्हटल्यावर त्या कर्माची व्यवस्था काय? ‘क्षणमेकं ऋतं ऋतः शतस्यापि ।’ एक क्षण आत्मनिष्ठेत राहिले तरी शेकडो यज्ञ केल्याचे पुण्य मिळते असे श्रुती सांगते. जेवतांना, खातांना, पाणी पिताना, येतांजाताना, श्वास उच्छ्वास करताना सहजरित्या घडणाऱ्या कृमिकीटकादि जंतूंच्या हत्येचे पातक लागतेच. असे पातक करणे कोणास आवडेल? संचित ज्ञानाने नष्ट होत असते असे आपण गुहित धरू या. विषयेच्छा, पुढील जन्मांची आशा, कर्तृत्व, भोक्तृत्व आदि भावना शिल्लक रहात नाहीत म्हणून आगामी जन्म-कर्म ज्ञानींना नाही. प्रारब्ध अनुभवून संपते हे सर्व जरी आपण मानिले तरी देह असेपर्यंत घडलेले कर्म देव कोणाच्या माथ्यावर ठेवतो हे आपणास समजत नाही असा जर प्रश्न केला तर श्रुतिस्मृती पुढीलप्रमाणे समाधान करते.

‘तस्य पुत्रादायमुपयन्ते सुहृदः सादुकृत्यां द्विषन्तः पापकृत्याम् । शरीराम्भकं कर्म तद्वेषी प्रियवादिनोः। काशि

ज्ञानी गृहस्थाश्रमी असेल तर पुत्रादीना, इष्ट-मित्र-भक्तादींना त्याचे पुण्य जाऊन त्यांचे पाप, त्यांचा द्वेष करून, निंदा करून त्यांना पीडा देत छळते. ज्ञानी नैष्ठिक बाल ब्रह्मचारी अथवा बाल संन्यासी असला तर त्याच्या देहाकडून घडलेले पुण्य त्याच्या पूर्वाश्रमीच्या आप्तेष्ठांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या भक्तांना मिळते व देहनिर्वाच्या दृष्टीने सहज घडणारे कोणतेहि पाप त्याचा द्वेष करणान्या त्याची निंदा करणा-या लोकांना प्राप्त होते; हा पहिल्या प्रश्नाचा विचार झाला.

एखाद्याचे प्रारब्ध बिघडले असेल तर त्यास निवृत्तिमार्गाने जाऊन मोक्ष मिळविणे शक्य आहे किंवा नाही? ह्या प्रश्नाचा विचार आतां करू या! हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने समजावयाचा म्हणजे मोक्ष पुरुष प्रयत्नाने साध्य आहे की प्रारब्धाधीन आहे ! असा प्रश्न केल्यासारखेच होईल, ह्या विषयासाठी मला आठवणारी मुक्तिकोपनिषदांतील कांही वाक्ये विचारांत घेऊ. मुक्तिकोपनिषदांतील दुसऱ्या अध्यायांत सामान्यतः पुरुष प्रयत्नाने मोक्ष साध्य आहे असे सांगितले आहे. ह्या अध्यायाचा

लागतेच. असे पातक करणे कोणास आवडेल? संचित ज्ञानाने नष्ट होत असते असे आपण गुहित धरू या. विषयेच्छा, पुढील जन्मांची आशा कर्तृत्व, भोक्तृत्व आदि भावना शिल्लक रहात नाहीत म्हणून आगामी जन्म-कर्म ज्ञानींना नाही. प्रारब्ध अनुभवून संपते हे सर्व जरी आपण मानिले तरी देह असेपर्यंत घडलेले कर्म देव कोणाच्या माथ्यावर ठेवतो हे आपणास समजत नाही असा जर प्रश्न केला तर श्रुतिस्मृती पुढीलप्रमाणे समाधान करते.

‘तस्य पुत्रादायमुपयन्ते सुहृदः सादुकृत्यां द्विषन्तः पापकृत्याम् । शरीराम्भकं कर्म तद्वेषी प्रियवादिनोः। काशि

ज्ञानी गृहस्थाश्रमी असेल तर पुत्रादीना, इष्ट-मित्र-भक्तादींना त्याचे पुण्य जाऊन त्यांचे पाप, त्यांचा द्वेष करून, निंदा करून त्यांना पीडा देत छळते. ज्ञानी नैष्ठिक बाल ब्रह्मचारी अथवा बाल संन्यासी असला तर त्याच्या देहाकडून घडलेले पुण्य त्याच्या पूर्वाश्रमीच्या आप्तेष्ठांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या शिष्यांना’ भक्तांना मिळते व देहनिर्वाच्या दृष्टीने सहज घडणारे कोणतेहि पाप त्याचा द्वेष करणान्या त्याची निंदा करणा-या लोकांना प्राप्त होते; हा पहिल्या प्रश्नाचा विचार झाला.

एखाद्याचे प्रारब्ध बिघडले असेल तर त्यास निवृत्तिमार्गाने जाऊन मोक्ष मिळविणे शक्य आहे किंवा नाही? ह्या प्रश्नाचा विचार आतां करू या! हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने समजावयाचा म्हणजे मोक्ष पुरुष प्रयत्नाने साध्य आहे की प्रारब्धाधीन आहे ! असा प्रश्न केल्यासारखेच होईल, ह्या विषयासाठी मला आठवणारी मुक्तिकोपनिषदांतील कांही वाक्ये विचारांत घेऊ. मुक्तिकोपनिषदांतील दुसऱ्या अध्यायांत सामान्यतः पुरुष प्रयत्नाने मोक्ष साध्य आहे असे सांगितले आहे. ह्या अध्यायाचा प्रारंभच असा होतो.

‘ तथा हैनं श्रीरामचन्द्र मारूतिः पप्रच्छ । केयं वा तत्सिद्धिः सिद्धया वा किप्रयोजनमित्ति ।’

‘तत्त्वज्ञान हे सिद्धिप्रमाणे आहे. त्या सिद्धीचे काय प्रयोजन आहे ?’ असे श्रीमारुतिरायाने श्रीरामचंद्राना विचारले आहे. त्यास श्रीरामचंद्रानी उत्तर दिले की ‘पुरूषस्य कर्तृत्वभोक्तृत्वसुखदुःखादिलक्षणाश्चित्तधर्मः क्लेशरूपत्वाद्बन्धो भवति । आरशांत दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणे जीवनांत दिसून येणारे कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखदुःख हे त्याचे धर्म नसून त्याच्या चित्ताचे धर्म आहेत. त्यांच्या केवळ अध्यासाने जीवनांत क्लेश झाल्याप्रमाणे आढळून येते. ह्याच्यामुळे क्लेश होत असल्यामुळेच मन हैं दुःखरूप बंधन आहे असे म्हणतात तन्निरोधनं जीवन्मुक्तिः ।। स्फटिकांत दिसून येणाऱ्या अन्य पदार्थाच्या रंगाप्रमाणे हे केवळ भ्रामक रितीने माझ्यांत दिसून येतात. हे असे दिसत असले तरी स्फटिकाप्रमाणे किंवा आरशाप्रमाणे मी त्यास नष्ट करून आपल्या केवळ आनंदरूपाने त्यांना प्रकाशित करणारा आनंद चिन्मात्ररूप आहे असे जाणून, त्यांचा कोणताहि परिणाम आपणावर करून न घेतां एका आनंदरूपाच्या निष्ठेने सदैव निर्विकल्प रहाणे यासच ‘जीवनमुक्ति’ असे म्हणतात.

उपाधिविनिर्मुक्तघटाकाशवत्प्रारब्धक्षयाद्विदेहमुक्तिः ।

घट फुटून घटाकाश ही उपाधी गेल्यावर ते महादाकाशांत मिळण्याप्रमाणे देह पडल्यावर जीवास असणारी देह ही उपाधी नष्ट होऊन जीव परब्रह्मांत मिळून जाऊन एकरूप होणे म्हणजेच ‘ विदेहमुक्ति’ जीवन्मुक्तिविदेहमुक्त्योऽष्टोत्तरशतोपनिषदः प्रमाणम् ।’ आत्मज्ञानाने जीवास जीवनमुक्ति आणि विदेहमुक्ति खरोखरच निश्चितपणे प्राप्त होते ह्यास अष्टोत्तरशतोपनिषदे प्रमाणभूत किंवा साक्षी आहेत. ही जीवनमुक्ति व विदेहजीवनमुक्ति साधन असल्यामुळे कोणते प्रयोजन हाती येत असेल तर ते कर्तृत्वादिदुःखनिवृत्तिद्वारा नित्यानन्दावाप्तिः प्रयोजनं भवति।‘ कर्तृत्वादि दुःखरूप असणारी सर्व बंधने नष्ट होऊन त्याहून श्रेष्ठ अशी नित्यानंदप्राप्तीच जास्त महत्वाचे प्रयोजन होय. ह्या नित्यानंदरूपी मोक्षाची प्राप्ती प्रारब्धाने प्राप्त होते की पुरुष प्रयत्नाने साध्य होते? ‘तत् पुरुष प्रयत्नसाध्य भवति ।’ ते पुरुष प्रयत्नाने साध्य आहे. स्वतः बद्ध असलेल्या जीवास आपल्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी दुसरे कोणतेहि प्रारब्ध वगैरे आड येत नाही. येथे अन्य कोणत्याही गोष्टीचा संबंधच नाही. स्वरूपाचे तितके निश्चित नसते.

‘अथ चेदशुभो भावस्त्वां योचयति सङकट। प्राक्तनस्तदसौ यत्नाज्जेतव्यो भवता कपे॥’

हे कपीश्वरा ! कामादि दुष्टवासना, अशुभ विचार निर्माण होत असतील तर पुरुषप्रयत्नाने साध्य होणाऱ्या श्रवण, व निदिध्यास इत्यादींनी त्यांतहि विशेषतः स्वरूप लक्षणांच्या धारणेने ते नाहीसे केले पाहिजेत. शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां बहन्ती वासना सरित् । पौरूषण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि ॥ अशुभेषु समाविष्टं शभेष्वेवावतारयेत् ॥

‘शुभाशुभ मार्गाने वासना प्रबळ होते. आपल्या प्रयत्नाने आपल्या मळ्यांत पाणी वळविल्याप्रमाणे वासना शुभमार्गाकड वळविली पाहिजे. पाणी दुसरीकडे वाहून जाते असे समजतांच तेथे त्या बाजूने बांध घालून पाणी अडविले जाते त्याप्रमाणे चित्त अशुभ भावनांच्याकडे, अपवित्र भावनांकडे, वैषयिक भावनाकडे वाहात आहे असं वाटतांच विवेकाने त्यास बांध घालून शुभ वासनेकडे ते वाहील असे करावे,’ असें श्रीरामरायानी श्रीमारुतीरायास निमित्तमात्र करून आपणां सर्वांस सांगितले आहे. आकाशांत मेघाकृति दिसून ती नाहीशी होते त्याप्रमाणे ज्ञानमात्र असणा-या आपणांतच ती वृत्ती दिसून परत विरून जाते. समुद्राच्या लाटा समुद्राहून अमिन्न असल्याप्रमाणेच व्यक्तीहि आनंदमात्र स्वरूपांत अभिन्न अशीच आहे असें जाणन अध्यासातून मोकळे झाले पाहिजे.

home-last-sec-img