Literature

भक्ति २

आज मी भक्तीसंबंधी सांगणार आहे. मनुष्यप्राण्याचा उद्देश अनंतसुखाची प्राप्ती करून घेण्याचा असतो. व तो साध्य करण्यासाठी त्याचे नाना प्रकारचे प्रयत्न चालं असतात. परंतु आपले साध्य काय? आपले ध्येय काय? हे निश्चितपणे ठरविल्याशिवाय केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. अशा प्रयत्नांचें फळ म्हणजे निराशा, अशांति, मनुष्याची अशी दुरावस्था होऊ नये आणि त्यांचे जीवनसाध्य न चुकतां तो सुखाच्या मार्गात जाण्यासाठी श्रुतिमातेने तीन मार्ग सांगितले आहेत. त्यानाच आपण योग म्हणतो आणि त्या योगांपैकी भक्ति’ हा एक योग आहे.

भक्ति करणे आणि ती साधणे कठीण नाही. कारण भक्ति म्हणजे प्रेम व प्रेम करणे म्हणजे भक्ति. भक्तीचे रूप म्हणजेच प्रेम असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या रूपांत भक्ति किंवा प्रेम माहित नसलेले किती जण मिळतील? त्याचा अनुभव नसलेले किती आढळतील?

भक्ति व प्रेम तात्त्विक दृष्टया एक असूनहि मानवकल्याणार्थ झटणाऱ्या ऋषिमुनींनी त्याची पार्श्वभूमी सांगून त्याचे स्पष्टिकरण केले आहे.

१) आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्या मनुष्यांवर आपण जी प्रीति करतो ती भक्ति नव्हे. उदाहरणार्थ, मित्रावरील प्रेमास स्नेह म्हणतात व मुलावरील प्रेमाला वात्सल्य म्हणतात. याला मित्रभक्ति अथवा पुत्रभक्ति असे कोणीहि म्हणत नाही.

समाजशिकामा गणग २) आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारा या ठिकाणी असलेल्या प्रेमास ‘भक्ति’ हे नांव योग्य ठरते. मुलांना आपले आईवडील श्रेष्ठच. ते आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या मुलांचे आपलेपणाने व त्यागयुक्त प्रेमाने संगोपन करतात, त्यामुळे मुलांना श्रेष्ठतेची कल्पना प्रथमच प्राप्त होते. आईवडिलांवर असणाऱ्या मुलांच्या ह्या नैसर्गिक प्रेमाला मातृ-पितृ-भक्ति असेच म्हणतात. श्रीसद्गुरु आपल्या शिष्यांना व्यावहारिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असें दिव्य ज्ञान देत असतात. शिष्याचे अज्ञान घालवून, त्यांचे संकुचित विचार नाहीसे करून, त्यांच्या हृदयाची विशालता वाढवून पवित्र ज्ञान देतात. अनंत उपकाराच्या कृतज्ञतेच्या त्यांच्या प्रीतीलाच ‘गुरुभक्ति ‘ म्हणतात. याप्रमाणेच देशभक्ति. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ! हे सुभाषित यामुळेच प्रसिद्ध आहे. आपल्या हृदयांतील सात्त्विक अशा विशाल अभिमानाची अभिरुची देत असल्यामुळे, तसेंच आपल्या जीवनास नाना प्रकारचे सहयोग देत असल्याकारणाने देश किंवा आपले जन्मदाते आपल्यापेक्षा श्रेष्ठ होत व त्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रेमालाच ‘भक्ति’ हे नांव आहे. अशा ह्या भक्तीच्या स्वरूपांत किंचितहि कमीपणा येऊ नये म्हणून व भक्तीचे महत्त्व कायम समजण्यासाठी श्रुतिमातेचा सल्ला आहे. ‘मातृ देवो भव । आना देवो भव । अतिथि देवो भव । ‘ असा उपनिषदांचा उद्घोष आहे

पर्वापेक्षा सर्वश्रेष्ठ असा परमात्माच आहे व त्याच्याठायीं आपली भक्ति असणे आवश्यक आहे. ॐ परमात्मा म्हणजे ह्या चराचर विश्वांतील सर्व शक्तिमान सर्वव्यापी, सर्वगुणसंपन्न, सर्वोत्कृष्ट स्वरूप. त्याच्याच इच्छेनें हे  विश्व आपल्या मर्यादेमध्येच कार्य करते. त्याच्या इच्छेविरुद्ध एक काडीहि हलू शकत नाही. त्याच्या अगम्य शक्तीच्या प्रभावाने ही जड भमि पाण्यामध्ये तरंगते. समुद्र आपली मर्यादा सोडून भूपृष्ठावर आक्रमण करूं शकत नाही. परमात्म्याचे नियम, निबंध नसते तर हे सर्व शक्य झाले असते ? समुद्राला ‘अपाम्पतिः’ म्हणतात. परंतु तोहि परमात्म्याच्या सत्तेच्या शासनाच्या अधीन आहे. मग ह्या विश्वांतील पदार्थामध्ये किती वैचित्र्य आहे ते पहा! त्याचे घटक असलेल्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीला शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पांच गुण आहेत. जळाला गंधाखेरीज चार गुण आहेत. अग्नि डोळ्यांना दिसतो; त्याला रूप, शब्द व स्पर्श हे तीन गुण आहेत. वायूला शब्द व स्पर्श हे दोन गुण असून आकाशाला मात्र शब्द हा एकमेव गुण आहे. अशा निरनिराळ्या गुणधर्माच्या पदार्थांनी ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ति झाली आहे. ब्रह्मांडें अनेक असून ती विशाल अंतरिक्षांत तरंगत आहेत. निराधार असलेल्या ह्या ब्रह्मांडांना अंतरिक्षांत उचलून धरणारी शक्ति कोणती? असा विचार केला तर परमात्म्याची अपार अद्वितीय सत्ता हीच शक्ति आपणास आढळून येईल. काय आश्चर्य आहे पहा!

आपल्या सभोवार असलेल्या पृथ्वीच्या व्यवहाराचे निरीक्षण केले तर किती प्रकार आढळतात. सूर्य अत्यंत तेजस्वी तर चंद्राला शांत सुंदर प्रकाश. अग्नि आपल्या तावडीत सांपडलेल्यांना भस्म करतो. सूर्याच्या तेजस्वी किरणांनी जमीनीवरील पाण्याची वाफ होऊन वर जाते व विशिष्ट प्रकाराने त्या वाफेला गारवा लागून पाऊस पडतो. पावसाने पिके येऊन अनंत कोटी जनतेचे जीवन जगते. अशा क्षुल्लक गोष्टींचा विचार केला तरी परमात्म्याच्या शक्तीची थोडक्या प्रमाणांत कल्पना येते. बुद्धिपुरस्सर ह्या गोष्टींचा विचार करूं लागल्यास साहजिकपणेच दुर्दम्य अशी भक्ति आपल्या मनांत उत्पन्न होते.

लहानशा बी पासून महावृक्ष तयार होतो. आपण आपला’ असें म्हणविणाऱ्या देहामध्ये आपणांस न कळतां असंख्य क्रिया होत असतात. अतिसूक्ष्म असणाऱ्या बुद्धीला न कळत अशी विचित्र परिवर्तने होत असतात; प्रकृतीच्या विरुद्ध वाटणाऱ्या किती तरी अद्भुत घटना घडत असतात. हे सर्व परमात्म्याच्या अनंत शक्तीचे अंशत: परिणाम आहेत. हा देह अन्नाचाच आहे. परंतु देहाच्या पूर्वीचे व नंतर होणान्या गोष्टीचे निरीक्षण केल्यास आपणांस आश्चर्य वाटेल. ‘आत्मनः आकाशः सम्भूतः। आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्भ्यः पृथिवी । पृथव्याः ओषधयः । ओषधीभ्योऽन्नं। अन्नाद्रेतः। रेतसः पुरुषः। ‘ परमात्म्याने आपल्या अगम्य शक्तीने सष्टीची निर्मिती केली. त्यांत आकाश, वायु, अग्नि, पाणी, भूमि, वनस्पती हे एकापासून एक अशा क्रमाने अत्पन्न झाले. वनस्पतीपासून अन्न, अन्नापासून अंडज, जारज स्वेदज व उद्भिज अशी चार प्रकारची आहारमय शरीरें निर्माण झाली. गर्भाशयांत रजोरेतसाचें सूक्ष्म परिमाण शिरून त्यांची नऊ महिने पावेतो वाढ होऊन तें शिशुरूपाने बाहेर पडतात व पुढे त्याची वाढ होऊन ते बालस्वरूपी नाना प्रकारच्या प्रकृतींनी व शक्तींनीयुक्त दिसू लागतात. देहाच्या ह्या सर्व परिवर्तनाच्या व रूपांतराच्या बुडाशी काय आहे ? परमात्म्याची आश्चर्यजनक कृतीच नाही का?

आपले देहधर्म व नित्याचे व्यवहार नेहमीच चालू असतात ते व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी क्रियाकर्मरूपी परिणाम असावेत असा विचार उद्भवतो. आपणांस बोलण्याची शक्ति निसर्गतः आहे. परंतु त्यांतहि किती वैचित्र्य आहे. चामड्याचे ओठ, जीभ दातासह हलत असतां त्यांत वारा घेऊन आपणास हवे ते उच्चार उमटविता येतात. एवढ्याशा डोक्यांत किती विचार, किती विषय भरलेले आहेत? अवाढव्य सृष्टीबद्दल सूक्ष्म व विशाल विचार आणि तिच्या संबंधीचे सुसंबद्ध ज्ञान या डोक्यांत भरलेले आहे. ह्या चराचर विश्वाचे सत्यस्वरूप परमात्माच होय. सुखप्राप्ती होण्यासाठी आपण कितीतरी कष्ट घेतो, तें सुख म्हणजेच परमात्मा. विश्वांतील सर्वशक्ति ज्याच्या अंश आहेत त्याच्या अल्पशा शक्तीचे प्रदर्शन म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडाच्या निर्मितीला कारण परमात्माच आहे. हे उघड दिसते. त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे व त्याच्यांतच तल्लिन होणे हेच ह्या मानवी देहाचें सार्थक होय.

आपणांस हवीशी वाटलेली कोणतीहि वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी आपण अत्यंत प्रेमाने प्रयत्नशील असतो. प्रीति, प्रयत्न व प्राप्ति यांचा एकप्रकारे संबंध आहे. जास्त आवडीची वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी समंजसपणे जोराचे प्रयत्न करीत असतां ती वस्तु प्राप्त होणे हेच त्याचे फळ.

आपल्याला नेहमीच परमात्म्याची आवश्यकता असते. त्याची कृपाच आपले रक्षण करतें. परमात्मा म्हणजे सुखाचा सागरच. तो परमसुखस्वरूप आहे. जगांतील अनंत वस्तू सुखाचा लेश आहे म्हणून ह्या जगाची उत्पत्ति करणाऱ्या परमेश्वरांत सर्व सुख आहेच. अनंतकोटी ब्रह्मांडास कारण असलेल्या परमेश्वराच्या ठायीं अगाध व अगम्य सुख आहेच. ह्यावरून सुखाचें मूळ परमेश्वरच होय. निर्माण झालेल्या सर्व पदार्थाना रस, गंध व आकर्षकता आहे. हे सर्व गुण त्यांना उत्पन्न करणाऱ्या परमेश्वरामुळेच आहेत हे तर्क सिद्ध होय. म्हणूनच जगातील सर्व वस्तूमध्ये असणारे सुखलेशाचे मूळ परमात्मा आहे. खरे सुखसर्वस्व म्हणजेच परमात्मा. उत्पत्ति लय ह्यांनी युक्त असणारे हे जग तुच्छ होय. हे परमेश्वराच्या इच्छेनुरूप रहाते. स्वतःच्या पायाने आलेल्या बिभीषणाला आश्रय देऊ नये असे मंत्री म्हणताच श्रीरामप्रभूनी सांगितलेले वचन आठवा. ‘निमिषार्धन संहन्निमिषार्धतः सजामि । अर्ध्या निमिषात मी सर्वाचा संहार करू शकतो तसेच त्यांचे निर्माणहि करू शकतो, असे परमेश्वराचे अगाध सामर्थ्य आहे. आपणास सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करावयास असल्यास परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम ठेवलेच पाहिजे. परंतु लाखामधून एखादा भक्त व कोटीतून एखादाच मुक्त होतो. म्हणजेच परमेश्वच्या ठिकाणी प्रेम असणारे कमीच!

जगाचे मूळ परमात्माच होय. जगोत्पत्तीपूर्वी हि तो होता. निर्माण केलेले जग चालविण्याकरता त्याने त्या जगात प्रवेश केला. ह्या आपल्या देहातहि तो आहेच. परमेश्वर नाही म्हणजे काहीच नाही. त्याची शक्ति विश्वव्यापी आहे. अशा परमेश्वराचे यथार्थरूप समजून न घेता, त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न न करता इतर दुसन्या विषयामध्ये सुख शोधल्यास ते सापडेल काय ? सुख एकीकडे व आपण शोधतो दुसरीकडे. अशा प्रांत लोकांना विषयामध्ये प्राप्त होणारे सुख काल्पनिकच असते. कल्पनेच्या सुखाला कांही स्थैर्य आहे कां? एक वेळ एखाद्या विषयात दिसलेले सुख दुसऱ्या क्षणी तेथे आढळत नाही. एकेकाळी प्रिय झालेली वस्तु दुसऱ्या वेळेस प्रिय होईलच हे सांगता येणार नाही. एखाद्या वेळी एखादी वस्तु आवडली तरी काही वेळातच ती आवडेनाशी होते. ह्या सब कारणांनी मुखमय परमात्म्याला विसरून जगातील विषयांच्या काल्पनिक सुखाच्या मागे लागल्यास आशा मात्र वाढत जाते; संताप वाढून तो अग्निप्रमाणे हृदय जाळून टाकतो; नेहमीच असमाधान । वाटते व शांति मिळत नाही. एकंदरीत ह्या काल्पनिक सुखाच्या मागे । लागल्याने नेहमीच्या सामान्य सुखालाही आंचवून दु:खच वाढवून घेतल्यासारखे होईल. खरे म्हणजे परमात्म्याला विसरुन केलेली | सुखाची इच्छा विनाशकारीच. खरे सुख म्हणजे परमात्मा. परमात्म्याच्या ठायीं प्रेम करून शांति मिळविणेच योग्य होय.

आवश्यकतेनुसार प्रेमाची उत्पत्ति होते. जगाचे दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी शाश्वत सुखाची जास्त आवश्यकता असते हे स्पष्ट आहे. परमात्माच शाश्वतसुखरुप आहे. परमात्म्यापासून सुखप्राप्ती होते असे समजून संसारात वागल्यास, संसारावर आपण जेवढे प्रेम करतो त्याच्या शतांश प्रेम परमात्म्याच्या ठिकाणी करून भक्ति केल्यास आपणांस ‘सायुज्यप्राप्ति होईल. माझ्या ठिकाणी आपले चित्त स्थिर केल्यास तुमचे सर्व कष्ट दूर होतील’ असे भगवद्वचन आहे. तरी सुद्धा जे पुण्यात्मे आहेत त्यांनाच संकटकाली परमेश्वरांची आठवण होते.

मनुष्याला पैशाची गरज लागल्यास तो सावकाराकडे जाऊन लाचारीने, दैन्याने पैसे मागतो. तसेंच परमात्म्याजवळ मागितले तर? तो तर लक्ष्मीपती आहे. सर्व जग त्याचा कोटयांश किंवा समुद्रातील एक थेंबच. त्याच्या नांवात अनंत सामर्थ्य आहे. त्याला हाक मारल्यास आई आपल्या मुलाकडे जशी धांवत येते त्याप्रमाणे तो धांवत येईल. मग काय कमी पडणार? हे सर्व काही माहीत असूनहि लोक फसतात. त्यांची कोठेच निष्ठा नसते. आपण भक्तिभावानें, गजेंद्राप्रमाणे किंवा द्रौपदीप्रमाणे त्याचा धावा केल्यास परमात्मा धावून येतोच येतो. आपल्या ह्या संसारजाळांत आपण परमेश्वरास विसरतो. अशा वेळी सूक्ष्मपणे आत्मनिरीक्षण केल्यास आपणांतच भक्ति नाही असेंच आपणास आढळून येईल.

नारद भक्तिसूत्रांत ‘परमप्रेमरूपाच ।’ असे भक्तीचें लक्षण सांगितले आहे. परमात्म्याच्या ठायीं अत्यंत प्रेम ठेवून कार्यप्रवृत्त व्हा! ह्यासाठी भौतिक व्यवहारात आपण जेवढे प्रेम ठेवतो तेवढे प्रेमहि पुरेसे आहे. त्यामुळे परमात्म्याची प्राप्ति होईल. आपण ज्यावर ज्यास्त प्रीति करूं त्याचाच साक्षात्कार होत असतो. आपणांस विषयांचे प्रेम असेल तर आपल्याला त्याचाच साक्षात्कार होईल. परंतु त्यापासून काय फायदा? एवढे काबाडकष्ट करुन शेवटी काय मिळणार ? केलेल्या प्रयत्नांचे फळ कोणते ? आपल्या सुखाच्या कल्पनेपेक्षा हे सुख वेगळे असेल तर आतापावेतो अहोरात्र केलेल्या कष्टांचा काय उपयोग? फायदा व अर्थ नसलेला व्यवहार कशासाठी व कोणासाठी ? ह्या सर्वापेक्षा श्रेष्ठ अशा नित्यानंद-परमात्मपदासाठी वर्णाश्रमधर्मास अनुसरून कष्ट करा, तोच फायदा! प्रामाणिकपणे कष्ट केल्याने सार्थक होईल.

आपली सर्व कामें, जीवनातील प्रत्येक क्रिया परमेश्वरप्राप्तीसाठीच आहेत तसेच त्या परमेश्वराच्या सेवेसाठी आपण सर्वकाही करतो असे समजून, औदासिन्य सोडून कामें केल्यास आपल्याला त्याचे सर्व श्रेय प्राप्त होईल. परमात्मप्राप्तीसाठीच हा नरजन्म मिळाला असता यःकश्चित विषयासाठी त्याला राबवावयाचे काय? प्रीतीसारखा अमुल्य पदार्थ काल्पनिक सुखाच्या मागे लागून घालविणे इष्ट आहे काय ? संपूर्ण जीवनातील एकमेव लक्ष्य असलेल्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रेम, प्रीति, भक्ति हे एकमेव साधन आपल्या हाती आहे निश्चयाने, निर्धाराने प्रेम संपादन करा! त्यासाठीच आपले जीवन आहे हे ध्यानात ठेवा ! आपले दैनंदिन न्याय कष्ट व्यवस्थितपणे चालू ठेवा पण ती कामें परमात्म्याच्या आज्ञेनुसार आणि ही सर्व परमात्म्याची सेवाच आहे अशी जाणीव ठेवून करा! ह्या पद्धतीने आपण परमेश्वरासाठी काम केले व प्रेमाने वागलो तर खरोखरच भक्ति केल्यासारखे होईल.

ज्यांना माझी प्राप्ति झाली असे महात्मे पुन्हा दुःखमूल असे संसारात परत येत नाहीत, असे श्रीकृष्ण परमात्म्यानी  सांगितले आहे. परमात्म्याच्या प्राप्तीकरता अत्यंत प्रेमळ भक्तीने साधन करणे आवश्यक आहे. जीवनातील सर्व व्यवहार त्या साधनेकरतांच झाले पाहिजेत. असे झाले तरच खरे सुख प्राप्त होईल. सुखाच्या भ्रांतीने जगाची उत्पत्ति झाली आहे. ती भ्रांती नाहीशी होऊन आत्मसुखस्वरूपाचे खरेखुरे दर्शन घडल्यास त्या सुखांत एकरूप होऊन, याहुन सुख निराळे आहे असें न वाटणे ह्यालाच ‘नित्यसुखब्रह्मानंद’ असे म्हणतात. तें सुख म्हणजे परमात्माच!

ॐ तत्सत्

home-last-sec-img