Literature

भक्ति 3

‘श्रेष्ठेष्वनुरागो भक्तिः।’ अनुराग म्हणजे भक्ति. स्थानभिन्नतेमुळे अनुरागाचा अर्थ प्रीति, प्रेम, प्रणय, भक्ति इत्यादि होतो. | माता-पित्यांच्या मुलाबाळासंबंधी असणाऱ्या अनुरागास ‘प्रीति म्हटले जाते. तरुण तरुणींच्या अनुरागास ‘प्रणय’ किंवा ‘प्रेम। म्हटले जाते. मुलांच्याकडून आईवडिलांच्या ठायी दर्शविल्या जाणा-या अनुरागास ‘मातृभक्ति “पितृभक्ति’ असे म्हणतात. हाच अनुराग श्रेष्ठ लोकांबद्दल असतो तेव्हा त्यालाच ‘भक्ति’ म्हणतात. जसा , गुरुभक्ति’ ‘देवभक्ति’ इत्यादि.

परमेश्वराच्या ठायी असलेले निरतिशय प्रेम म्हणजेच भक्ति’ होय. सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतरूपा च ।’ परमात्म्याच्या ठायी असलेली निष्कामभक्ति अमृतस्वरूपा’ होय. म्हणूनच ती नाशवंत नसते. सर्वात्म असा परमात्मा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट आहे अशा भावनेने दिन प्रतिदिन दृढ दृढतर होत जाणा-या अनान्यसक्त भक्तीसच ‘पराभक्ति’ म्हणसा येईल. ‘सा पराभक्तिरीश्वरे।’ तीच सर्वोत्कृष्ट भक्ति होय.

परमेश्वराने आपणावर कृपा करावी ह्यासाठी काय करावयाचे असा प्रश्न निर्माण होतो. आपल्यावर आईवडिलांचे प्रेम कायम राहण्यासाठी काय करावे लागते ? त्याप्रमाणे ईश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काय करावयास हवे ? आईवडिलांची सेवा केली असतां व त्यांच्या आज्ञेचे पालन केले असता त्यांचे प्रेम मुलाबाळांवर कायम टिकते. ही गोष्ट तुम्हां सर्वा प्रापंचिकांना माहीत आहे. आपण सर्वजण त्या परमेश्वराचीच मुले असल्याने त्याचा कृपाप्रसाद प्राप्त होण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे व त्याची सेवाहि केली पाहिजे.

प्रीतीनेच प्रीति वाढते असा मानवी मनोधर्म आहे. हीच गोष्ट देव लोकांसहि उपयोगी पडणारी आहे. म्हणूनच परमात्म्याबाबतहि तीच गोष्ट योग्य ठरणार. परमात्म्याच्या ठायी अनन्य भाव, प्रीति, प्रेम ठेवणे हीच भक्ति होय. त्या भक्तीस अनुरूप अशीच प्रीति परमात्माहि दाखवतो. सर्वशक्तिमान अशा भगवंताच्या कृपेने कोणती गोष्ट सहजरित्या साधणार नाही ? सावकार किंवा अधिकारी यांचा विश्वास संपादून व सेवा करून त्यांना संतुष्ट करून घेतल्यास आपणास हवे असलेले प्राप्त करून घेणे शक्य होते. असे असल्यामुळे आपल्या भक्तीने संतुष्ट झालेला परमात्मा प्रसन्न झाल्यावर आपणांस काय साध्य करून घेता येणार नाही. धन-कनकादी सर्व भोग्य वस्तुति मिळतील. परंतु खरा भगवद्भक्त ह्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करणार नाही. तो परमेश्वराजवळ अचलभक्तींची याचना करील. ‘तुझी कृपा कायम असं दे’ अशी परमेश्वराजवळ पुन्हा पुन्हा प्रार्थना करील. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचाच अनुभव घेत सदासर्वदा आनंदित राहील.

परमेश्वराची प्रीति प्राप्त करून घेण्यासाठी निरनिराळे योग साधनीभूत असले तरी त्यांत ‘भक्तियोगच श्रेष्ठ व सुलभसाध्य आहे असे म्हटले जाते. विश्वासरहित भक्तीने कोणताहि मार्ग सुगम होत नाही, असे म्हटले जाते. ‘अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ।’ ह्या वाक्याचे तात्पर्य, इतर मार्गापेक्षा भक्तिमार्गातच जास्त सुलभता आहे हेच होय, निरनिराळ्या योगसाधनांनी सर्व काही साध्य होत नाही. देहदंडणा मनोनिग्रह वगैरे उग्र कार्य त्यांत सांगितली आहेत. पण भक्तिमार्ग तसा नाही. भक्तींचे मुख्य ‘अनन्यशरणांगती’च होय.

हे दयाघन परमात्मा ! तूंच माझा उद्धार कर. मी दुसन्या कोणासहि शरण जाणे शक्य नाही.’ अशी एक दृढभावना असली की भक्तिमार्ग सुलभतेने साधता येतो.

कलियुगांत ‘भक्तिरेव गरीयसि।’ असे म्हटले जाते. कलियुगांत मानवशक्तीचा हास झाल्यामुळे अनुष्ठानादि साधनें कष्टसाध्य असल्याकारणाने त्यांच्यापेक्षां भक्तीलाच जास्त प्राधान्य आहे.

प्रीतीनेंच प्रीति उत्पन्न होते. अधिकारबलाने अथवा कायद्याच्या निबंधानेसुद्धा न होणारी कामें केवळ प्रीतीमुळे सुलभरित्या होतात. त्याचप्रमाणे शास्त्रविधीने साध्य होण्यास अशक्य असलेली भगवद्पा केवळ भक्तीनेच सुलभरितीने साधता येते. एखाद्याच्या अधिकाराला | घाबरून कार्यप्रवृत्त झालेले लोक वाणीने व शरीराने याचा अधिकार मान्य करूनच कार्यप्रवृत्त झालेले दिसत असले तरी मनाने ते कार्य प्रवृत्त झाले असतीलच हे मात्र सांगता येणार नाही. अशा कडक मालकासंबंधी मजर मनामधून अप्रीतोच दाखवितो. तो त्यास मनातून शिव्याच देत असतो. मन न लावून केली जाणारी कामें कधीहि चांगली होत नसतात. म्हणन प्रीतिपूर्वक भक्ति होच सद्यः फलकारी होय.

प्रेमानेच माणसें वश होत असता असें असल्याकारणाने भावनाप्रधान असलेल्या परमात्याची भक्ति हीच योग्य परिणामकारी आहे ह्यांत आश्चर्य कोणते ? ‘ भावे हि विद्यते देवः।’ भावांतच परमेश्वर आहे. त्यासाठी बलानेच त्याला वश करून घेतले पाहिजे.

‘भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ॥ ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥’

माझे भक्त भक्तीच्या योगानेच माझे स्वरूप यथार्थत्वाने जाणतात. अशा प्रकारे माझे स्वरूप यथार्थत्वाने जाणणारे असे जे माझे भक्त आहेत ते माझ्यातच विलीन होतात. ते माझ्यापासून भिन्नत्वाने शिल्लक राहं शकत नाहीत. असे भगवान श्रीकृष्णानी म्हटले आहे. भक्तीतच परमात्मपद प्रविष्ट असल्याने परमात्मा भक्ताधीन आहे. ह्यासाठीच परमात्मप्राप्तीसाठी भक्तीशिवाय इतर कोणत्याहि साधनाची आवश्यकता नाही. ‘भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैः भक्तिप्रियः श्रीहरिः।’ अविचल अशा भक्तीनेच भगवान तृप्त होतो. इतर कोणत्याहि कारणाने तो तृप्त होत नाही. भगवंतास ‘भक्तिप्रिय’ असें म्हणतात. भगवान भक्तिरूप पाशानेच बद्ध होतो असें पुराणादिमध्ये सांगितले आहे.

लौकिक व्यवहारांत सुद्धां प्रीतीसारखे दुसरे कोणतेहि बंधन नाही. ‘बन्धनानि किल बहूनि सन्ति।’ नाना प्रकारचे पाश असले तरी प्रेमपाशासारखा दुसरा कोणताहि पाश नाही. प्रेमपाशाचे लक्षण अतिशयच विलक्षण. कितीहि कठीण असलेल्या वृक्षास छिद्र पाडण्या शक्ति असलेला भुंगा कमलदलांत सहज गुरफटला जातो. कमलाची कोमल दलें कूरतण्यास तो तयार होत नाही. कारण त्याला कमलाच्या बद्दल मोह असतो. त्या मोहपाशामुळे तो त्यांत गुरफटल्याने त्यातन बाहेर पडण्याची तो इच्छाच करीत नाही. प्रेमपाश लोखंडी गजापेक्षांहि महाकठीण आहे. प्रेमपाश तोडणे कोणासहि सहज शक्य होत नाही.

परमात्मा निर्गुण, निराकार आहे. तरीहि भक्तांच्या भक्तिपाशास मोहून तो भक्तानी कल्पिलेले आकार, रूप धारण करून भक्ताच्या कार्यसिद्धीस तत्पर असतो. ‘उपासकानां कार्यार्थं ब्रह्मणो रूपकल्पना । परमामत्मा आपल्या भक्तांच्या भक्तीला अनुरूप, त्याच्या हितसाधनेसाठी साकार साक्षात्कार स्वरूप धारण करून त्यांना दर्शन देतो; त्याची कार्यसिद्ध करतो. प्रेमवश होणारा परमात्मा मानवरूप धारण करून शिशुप्रमाणे वाललोलाहिं आचरतो, तरूणाप्रमाणे प्रणय व्यवहारहि करतो; कोप, संतापहि प्रकट करतो व सुखदुःखाच्या अनुभवाचेहि नाटक करतो.

प्रेमांध व्यक्तीस दुःखाची जाणीव होत नाही व प्रेमपात्र असणा-या माणसांचे दोषहि त्यास दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे भक्तिपरवशतेमुळे शरणागत अशा आपल्या भक्तांचे सर्व दोष विसरून परमात्मा त्याच्यावर कृपा करतो म्हणून त्रिसत्यस्य भक्तितेव गरीयसि । भक्तिरेव गरीयसि । भक्तिरेव गरियसि ।’ असे नारदभक्तिसूत्रांत सांगितले आहे. भक्तीच सर्वात श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. परमात्म्यामध्ये अचल श्रद्धा ठेवून मानवाने त्याच्या रूपाचे चिंतन केल्यास ‘अमृतत्वमेति ।’ म्हणजे ते जरा मरणरहित होऊन चिरंजीवी होतात असे म्हटले आहे. म्हणूनच ‘तुम्ही सर्व माझ्याठायी मन रमविणारे व्हा’ असे भगवंतानी सांगितले आहे.

भगवत्चितन करण्याचे कार्य मनाचे आहे. मनाची ही शक्ति वाढविण्याचे काम मानवाचे आहे. भक्तिमार्गाकडे निष्ठेने मन वळविले पाहिजे. नाशिवंत व दुःखास कारणीभूत ठरणाऱ्या या संसारातील कोणत्याहि वस्तूवर विश्वास ठेवू नकोस. अविनाशी, सुखस्वरूपी, स्वयंसिद्ध अशा परमात्म्याचे चितन करून सुखी हो! ‘ असा मनास उपदेश करून त्याला भक्तिमार्गाकडे खेचन नेले पाहिजे.

मच्चित्तस्तन्मयो भवति गुह्यमेतत्सनातन ।’ जे ज्यात तन्मयतेने आसक्त्त होतात ते तत्स्वरूप होतात. भ्रमर-कीटक न्यायाने ही पुरातन गोष्ट सत्य आहे. याप्रमाणे तन्मयतेने आत्मस्वरूप प्राप्त करून घेणे महत्वाचे आहे. परमात्मा अज, अक्षर, अव्यय आहे. म्हणजेच त्यास जनन मरणादि नाही. तो सत्यस्वरूप आहे. परमात्म्याच्या ठिकाणी भक्ताने अनन्यासक्त्त होऊन तन्मय बनल्यास तो भक्तसुद्धा ‘तन्मयः’ होऊन जातो. प्रेमानेच प्रेम मिळविले पाहिजे अथवा वाढविले पाहिज. जे भक्त परमात्म्यास प्रेमवश करून घेतात त्यांचा परमात्मा दास होतो. सर्वैश्वर्य संपन्न, सकललोकपालक असणारा महाविष्णु चक्रवति बलिराजाचा सेवक झाला होताच की नाही! हा कशाचा प्रभाव ? हयाला प्रेमच कारणीभूत नव्हे काय? भक्ताभिमनी भगवंतास भक्ताच्याबद्दल दुजा भाव असूच शकत नाही..

केवळ स्वयंपाकाचा विचार केल्याने किंवा स्वयंपाकक्रियेचा अभ्यास केल्याने भूक शमणार नाही. पोट भरण्यासाठी स्वयंपाक करूनच जेवले पाहिजे. त्याप्रमाणे केवळ ज्ञानमात्राने मुक्ति मिळणार नाही. तर त्यासाठी ज्ञानाला भक्तीची जोड अत्यावश्यक आहे. श्रीमद् भागवतात ‘नैष्कर्ममप्यच्युत भावजितं । न शोभते ज्ञानमलं हि पुंसाम् । असे म्हटले आहे- म्हणजेच सर्वसंगपरित्याग करून संन्यास ग्रहण करताच मुक्ति मिळत नाही. परमात्म्यासंबंधी भक्तिभाव नसल्यास आपण समजवून घेतलेले वेदार्थज्ञानसुद्धा निव्वळ बडबड किंवा वितंडवादच होय. अशा ज्ञान वैराग्यास मुळीच किंमत नसते व त्यामध्ये को सामर्थ्यहि नसते, असे सर्वज्ञ श्रीव्यास महर्षीनी सांगितलेले आहे शब्दज्ञान किंवा निष्ठुर कर्माचरण ही साधनें नव्हेत. त्या सर्वांना भक्तीच्या तेजाची, प्रकाशाची नितांत आवश्यकता आहे.

पाश्चात्यांची वर्णने ऐकून किंवा त्यांचे फोटो पाहून किती मनन केले तरी त्यांची बोली भाषा आपणांस येऊ शकेल काय? आपणांस त्यांची बोली भाषा यावी असे वाटत असल्यास त्या भाषेचा क्रमवार अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्ञान हे कोरडे आहे. अनुभवाच्या केवळ वाक्यानी किंवा भाषेनें शांति मिळणार नाही.

‘अनन्तगुणमैश्वयं लभते यत्प्रसादतः।’ ज्याच्या दयेमुळे अनंतगुणरूप असे सकल ऐश्वर्य प्राप्त होते अशा सच्चिदानंदस्वरूप परमात्म्याचे अनन्यासक्तिभावाने ध्यान केल्यास सर्वकांही प्राप्त होते. सुगंधी द्रव्याने भरलेली पेटी सुगंधमयच होते. नको म्हटले तरी सुगंध पेटीस सोडू शकत नाही. ती पेटो उघडताक्षणीच ती खोलीसुद्धा सुगंधाने दरवळून जाते. त्याचप्रमाणे जेथे भगवद्भक्ति आहे तेथे आनंद आपोआपच प्राप्त होतो. आनंदवृत्ती हाच सुखाचा झरा होय. त्यामुळेच परमसुख सुलभतेने प्राप्त होते. म्हणून नेहमी मन भगवद्भक्तीतच तल्लीन केले पाहिजे. नामस्मरण, ध्यान, तल्लीनता हे भक्तीचे प्रेरक होत.

‘मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङगजितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥’

सर्व प्रकारची कर्मे करीत असता ती परमेश्वरार्पण बुद्धीनेच केली पाहिजेत. सर्व कर्मत्यागहि परमेश्वरासाठीच केला पाहिजे. ‘मी सनातन, शाश्वत, सर्वश्रेष्ठ आहे असे समजून माझी भक्ति केली पाहिजे. माझ्याशिवाय कोणतीच वस्तु नाही, कोणतेहि सुखकर नाही अशा भावनेने सदासर्वदा माझीच आराधना केली पाहिजे. सकल प्राणिमात्रात मीच सर्वात्मस्वरूप होऊन आहे ह्यावर विश्वास ठेवा. एखादेवेळी कोणत्याहि प्राण्याकडून वाईट गोष्ट घडली तरी त्यामध्ये देषबद्धी न ठेवता निर्वेरभाव ठेवावा. अशा प्रकारे जे भक्त वागतात तेच मला प्राप्त करून घेतात म्हणजेच माझ्या स्वरूपी लीन होतात आणि म्हणनच ते नित्यसुखी होत. असे वागणारेच माझे खरे भक्त होत व हीच खरी ईश्वर भक्ति ! ह्याप्रमाणे श्रीमद् भगवद् गीतेत भगवंतानी उपदेश केला आहे.

परमात्म्याने आणखीहि असे म्हटले आहे की, भक्त परमात्म्याच्या प्रीतीसाठीच जगतो. तो नेहमी परमात्मस्वरूपच पहातो म्हणजेच त्याने कोणत्याहि वस्तूकडे पाहिले तरी तीमध्ये त्यास परमात्म्याचे स्वरूपच दिसते; तो जे कानाने ऐकतो ते सर्व परमात्म्याच्या कथाच तो ऐकत असतो. अनृत, असत्य, परनिंदा इत्यादि दुर्वाक्ये त्याच्या तोंडातून कधीहि बाहेर पडत नाहीत. तो आपल्या सर्व इंद्रियकर्मानी परमात्म्याची सेवा करीत असतो. त्याचे जगणे परमात्म्यासाठीच; त्याची कम म्हणजे परमात्म्याचीच सेवा. त्याचे मन नेहमीच परमात्म्यध्याननिरत असते. तो परमात्म्याच्या दर्शनाचीच इच्छा करीत असतो, इतर कोणतीहि इच्छा तो करीत नाही; म्हणूनच तो ‘स लोकबाह्यः’ होऊन जनसमुदायापासून दूर असतो! असे जे भक्त आहेत ते डोळे झाकून चालले तरी परमात्मा त्यांना योग्य मार्गदर्शन करतो.

‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्यपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥

‘सर्व कांही विसरून माझाच आश्रय घेणारे जे माझे भक्त आहेत त्यांचा योगक्षेम मी चालवितो’ असे परमात्म्याने म्हटले आहे. हेच भक्तीचे महत्व होय. हीच भक्तांची सार्थकता. कबीराचे वस्त्र विणण्याचे काम परमात्माच करीत असे. परमात्म्यासाठी जे सर्व काही करतात त्यांच्यासाठी परमात्मा आपल्या सर्व शक्तीचा उपयोग करून त्यांची सर्व कार्य सिद्धीस नेतो.

नामदेव, तुकाराम इत्यादी भगवद् भक्तांची चरित्रे श्री भक्तिभावाने समजून घेतल्यास आपल्या अंगावर काटा उभा रहातो ‘अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम् ।’ असे म्हणण्याचा अर्थ कोणता? एखाद्याने विचारल्यास ‘साखरेच्या गोडीसारखा’ हेच उत्तर मिळेल भक्तीचे महत्व भक्तच जाणू जाणे. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही भक्तीचे वर्णन करावयाचे झाल्यास मानवी शब्द कमी पडतील. भक्ति भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवानेच समजू शकते. स्वानुभवानेच अनुभविता येणाऱ्या भक्तीच्या बाबतीत शब्दावडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा! समजून घ्या! तिच्या पासून चांगली फळे प्राप्त करून घ्या! असे सांगणेच जास्त श्रेयस्कर आहे.

भक्तिमार्ग हा ‘सर्वानुकूल:’ म्हणजे सर्वाना अनुकूल असाच आहे. वर्णाश्रमाचा घोळ नाही. सर्वाधिक:’ म्हणजेच सर्व मार्गापेक्षा श्रेष्ठतम आणि ‘अनंतसुखस्वरूप’ म्हणजे निरवधि सुखदायक आहे. भक्तिसंपन्न असणाऱ्या भगवद् भक्ताला तिन्ही लोक तुच्छ वाटतात.

भक्ति नऊ प्रकारच्या आहेत असे म्हटले आहे त्या भक्तीपैकी नामसंकीर्तन म्हणजे भगवन्नामस्मरणाने भक्तांचा उद्धार होतो. ह्या बाबतीत अजामिळाचे उदाहरण सर्वोत्कृष्ट आहे. कृतकर्माबद्दल पश्चात्ताप होऊन मनशुद्धि प्राप्त करून नामस्मरण केल्यास मानव पुनीत होतो ह्याबाबत शंकाच नको.

भगवंताच्या शक्तीमध्ये भक्ताची अचल श्रद्धा असली पाहिजे आणि तो आपला उद्धार करील हा दृढविश्वास असला पाहिजे. विश्वास ठेवल्याने तोटा होत नाही पण विश्वास न ठेवल्याने हानी होतेच होते.’ अशी संत पुरंदरदासांची उक्ती आहे. भगवंताबद्दल अचल श्रद्धा असल्याशिवाय केलेले कोणतेहि कार्य फलद्रूप होत नाही. भगवत् आराधना अचल निष्ठेने केल्यास मात्र फलप्राप्ति निश्चितपणे होतेच. परमात्म्याच्या ठिकाणी मन गुंतणे फारच कठीण. त्याच्यासमोर मन प्रपंचातील तापपत्रयाचेच ध्यान करणा-यांवर त्यांची कृपा कशी होणार? अचल श्रद्धेने भगवत् आराधना करणान्या भक्तांना

न तत् भासयते सूर्यो न शशाङको न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥’

सूर्य, चद्र, अग्नि हे ज्या स्थानास प्रकाश देऊ शकत नाहीत आणि ज्या स्थळी गेले असतां पुन्हा जन्म, मरण प्राप्त होत नाही अशा नित्य निर्विकार, स्वप्रकाशी सच्चिदानंद स्वरूपासारखे स्वरूप प्राप्त होते. कनवाळू असणान्या परमात्म्याच्या कृपेने तुम्हा सर्वांना वर सांगितलेला भक्तिमार्ग लाभो. त्या सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन होवो व तें स्वरूप तुम्हास प्राप्त होवो !

शेवटी एक गोष्ट सांगून आपण आजचे प्रवचन संपवू या. तो गोष्ट म्हणजे श्रद्धेविषयीचा विचार. श्रद्धा नसल्यास भगवान किंवा भगवद् भक्त ह्यापैकी कोणीहि तुमचे कल्याण करू शकणार नाहीत. भक्तीच मुक्तीला कारणीभूत आहे असे म्हटले जाते. ती भक्ति अचल पाहिजे. तींत युक्ति वगैरे असणे उपयोगाचे नाही. भगवंताचे नामस्मरण करणारे दांभिक आचार प्रवर्तक असे ज लोक आहेत, जे दिखाऊ भगवद्भक्त आहेत, ते खरे भगवद् भक्त नाहीत. त्यांना मुक्ति मिळणार नाही. त्यांच्या युक्तीचा काहीहि उपयोग होणार नाही.

विभीषण श्रीरामाचा भक्त होता. श्रीरामाच्या ठिकाणी त्याची अचल श्रद्धा असल्यामुळे तो जें जें कांही बोलत असे तें तें सत्य होत असे व तो जें करीत असे ते सर्व नित्य असेच असे. अशा सत्य नित्य भगवद् भक्तापाशी एक दिवस ब्राह्मण आला व ‘ही नदी मालाडून जाण्यासाठी मजजवळ एक पैसाहि नाही. पण मला रोज कामानिमित्त पैलतिरी जावे लागते. तुझ्या श्रीराम भक्तीच्या प्रभावाने मला एखादा सुलभ मार्ग दाखव-‘ अशी त्याने विनंती केली. हे ऐकून व त्या ब्राह्मणाची करुणाजनक परिस्थिती पाहून बिभीषणाने पानावर काहीतरी लिहून, त्याची घडी घालून त्या ब्राह्मणाच्या पदर बांधली आणि ‘तू ज्यावेळी हे वस्त्र नेसून नदीतून जाशील त्याना एखाद्या नाल्यातून आपण जसें चालतो त्याप्रमाणे तुला वाटेल, पण हे बांधलेले उघड्न पाहं नकोस.’ असे सांगितले. ब्राह्मणाने श्रद्धेने वस्त्र धारण करून नदीकाठी येऊन तो नदीत उतरला. आश्चर्याची गोष्ट अशी की, नदी पार करीत असतां त्यांचे कपडे भिजले नाहीत व त्याचे पायहि ओले झाले नाहीत. आपण जसे जमिनीवरून चालतो त्याचप्रमाणे तो पैलतिरी पोहोंचला. नंतर तो तसाच परत आला. झाल्या गोष्टीचे त्याला कुतुहल वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे तो नदीतून चालू लागला. पण चालतांना त्याचे मन चंचल झाले. ‘ ह्या पानावर असें काय लिहिले आहे हे पाहिलेच पाहिजे’ असे त्याच्या मनाने ठरविले. नदीच्या ऐन मध्यांत येतांच त्याने त्या वस्त्राची गांठ सोडली व लिहिलेले वाचलें. त्या पानावर ‘श्रीराम’ एवढेच लिहिले होते. ‘छद् ! एवढेच लिहिले. आपणहि एवढे लिहं शकतो. मीसुद्धा रामभक्त आहे. मला बिभीषणासी काय कर्तव्य आहे ? आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट मी कां म्हणून करावयाची?’ असा विचार त्याच्या मनांत येतांच तो त्या जलप्रवाहांत बुडून मेला. जोपर्यंत बिभीषणाच्या सांगण्यावर त्याची श्रद्धा होती. तोपर्यंत नि:शंकपणे तो पाण्यावरून जमीनीसारखे चालू शकला श्रद्धा संपता क्षणीच तो ब्राह्मण पाण्यात बुडाला. एखाद्या रबरी पिशवीस छिद्र पाडलें म्हणजे ‘फुस्’ असा आवाज होऊन तिच्यातील हवा निघून जाते त्याप्रमाणे श्रद्धा संपतांच त्या ब्राह्मणास बुडावे लागले.

परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा न ठेवता केलेले कोणतेहि कार्य भगवद् भक्ति ह्या स्वरूपांत येत नाही. श्रद्धा हीच शक्ति, भक्ति व मुक्ति ह्यांचे मूर्तस्वरूप होय. म्हणून तुम्ही माझी प्रवचने ऐकून त्याप्रमाणे श्रद्धेने आचरण केल्यासच तुमचे कल्याण होईल.

प्रापंचिक विषयांत जशी अत्यासक्त भावना असते तशीच अत्यासक्त भावना परमेश्वराच्या ठिकाणी ठेवणारा मनुष्य अत्युत्कृष्ट भगवद् भक्त होतो. धनकनकांत अत्याससक्ति बाळगणारा सोनार भक्त श्रेष्ठ पुरंदरास झालाच की नाही ! अत्यासक्ति हेच भक्तीचे लक्षण होय. ‘हे परमात्मा ! तूच मला मार्ग दाखव. दुसरा कोणताहि मार्ग मला सद्गति प्राप्त करून देणार नाही’ अशा भावनेने भगवंतास शरण गेल्यास तो दयार्द्र परमात्मा आपणास कधीहि विसरणार नाही.

खऱ्या भगवद्भक्ताला देहाभिमान असत नाही. त्याचे रक्षण भगवतच करतो. श्रीरामदास स्वामींना उसाच्या मळेवाल्याने उसाने बडविले तरी त्याच्या विरुद्ध एक शब्दहि न बोलतां या मळेवाल्याबरोबर भांडणाऱ्या आपल्या शिष्यांना त्यानी थोपविलें. अशाच रीतीने आपले सर्वस्व विसरून भगवंतास अनन्यभावाने शरण गेल्यास तो निश्चितपणे आपला उद्धार करील.

एकंदरीत श्रद्धा भक्तीच मानवाच्या उद्धाराचे प्रबळ साधन होय ! सगळे एका आवाजात म्हणा, ध्यान करा व तन्मय व्हा ! ‘त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेय सर्वं मम दीनबंधो॥’

सच्चिदानंदस्वरूप सर्वात्मा सर्वशक्तिमान अशा परमात्म्याच्या कृपेने तुमचे सर्वांचे जीवन दिव्य मंगलमय होवो !!

॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

home-last-sec-img