आर्यसंस्कृतीने आपल्या पुत्रांना पुढीलप्रमाणे शिकवण दिली आहे.
*' अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः |*
*दानं दया दमः शान्तिः सर्वेषां धर्मसाधनम् || '*
कोणालाही पीडा न देणे, सत्यभाषण करणे; कोणत्याच प्रकारच्या परस्वाचे अपहरण न करणे; सदैव
शारिरीक व मानसिक पावित्र्य राखणे; मनावर विजय मिळवून इंद्रियदमन करणे; यथाशक्ती अन्न, वस्त्र व धन
यांचे दान करणे; दयार्द्र होऊन दिनांचे संरक्षण करणे; दुष्टप्रवृत्तींच दमन करणे; नेहमी शांत राहून मनाचा क्षोभ
होऊ न देणे हाच समस्त मानवजातीचा धर्म होय.
आमची वैदिक आर्यसंस्कृती विश्वातील मानवमात्राकडून पुढील सर्वसामान्य व सुदृढ मागणी करते.
*' समानीव आकूतिः समाना ह्रदयानि वा |*
*समानमस्तु वो मनो यथावः सुसहासति || '*
विश्वातील सर्व मानवांनो ! अभ्युदय व निःश्रेयस यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे.
एकमेकांबरोबर सहयोग करावा. आपला प्रेमभाव एकमेकांबद्दल वाढता असावा. राष्ट्रीय, सामाजिक,
आर्थिक व पारलौकिक अशी सर्व कर्तव्ये आपण सर्वांनी एकमनाने केली पाहिजेत.
आज मीही आर्यसंस्कृतीच्या दिव्यवाणीचा पुनःउच्चार करून आपणा सर्वांना मंगलकामना इच्छितो.
*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*