Literature

मानवजीवनाचे ध्येय

हे सर्व विश्व इतके कष्ट सहन करून ज्या इष्टप्राप्तीकरितां अविरत प्रयत्न रात्रंदिवस चालवीत आहे तें एकच एक सुख असें शेवटी आढळून येतें. सुखं लब्ध्वा करोति नासुखं लब्ध्वा करोति । या छांदोग्य उपनिषदाच्या वाक्यानेंहि हेंच स्पष्ट होतें. ‘ कोणी कांहींहि सुख मिळाल्यानेंच करतो, कशामुळे कां होईना एकदां दुःखप्राप्ति झाली की कोणीहि पुन्हां तें करूं इच्छित नाहीं’, हा या उपनिषद्वचनाचा अर्थ. यः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः | असें श्रीशंकराचार्यांचेंहि पण एक वचन शत श्लोकींत आढळतें. या सुखाचा एकदां छडा लावून साधनांनी त्याची प्राप्ति करून घेणे व त्या निरवधि सुखांत अखिल भिन्नभाव विसरून, निरंकुश तृतीने या जगांत नांदणें, त्या आनंदांत एकरूप होऊन वागणे म्हणजेच मनुष्य जन्माचें एकध्येय व खरेखुरे सार्थक.

home-last-sec-img